WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार पैसे पीक विमा अग्रीम रक्कम वितरीत करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील अग्रीम रक्कमचे वाटप वेगाने सुरू आहे. आतापर्यंत ४७ लाख ६३ हजार नुकसान भरपाई अर्जांना मंजुरी मिळाली असून १ हजार ९५४ कोटी रुपये वाटप होणार आहे. यापैकी ९६५ कोटी रुपये आधीच वितरीत करण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम वितरीत करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या माहितीची पुष्टी आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कृषी विभागाच्या सादरीकरणात करण्यात आली.

खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानाबाबत सरकारने २४ जिल्ह्यांसाठी अधिसूचना काढली होती. १२ जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्यांचे कोणतेही आक्षेप नसून ९ जिल्ह्यांमध्ये कंपन्यांचे अंशत: आक्षेप आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील बीड, बुलढाणा, वाशिम, नंदूरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि अमरावती या ९ जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्यांचे आक्षेप आहेत. या आक्षेपांवर राज्य स्तरावर सुनावणी सुरू आहे. पुणे आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये सुनावणी संपली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत १ कोटी ७० लाख ६७ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना राज्य शासनाने केवळ १ रुपयात पीक विमा दिला आहे. या योजनेसाठी एकूण ८ हजार १६ कोटी रुपयांचा विमा हप्ता द्यावा लागणार आहे. ३ हजार ५० कोटी १९ लाख रुपये असा पहिला हप्ता देण्यात आलेला आहे.

पर्जन्यमान आणि पीक पेरणी

राज्यात या वर्षी ३१ ऑक्टोबर अखेरपर्यंत सरासरीच्या ८६ टक्के पाऊस झाला आहे. यामुळे रब्बीसाठी ५८ लाख ७६ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले असून आत्तापर्यंत २८ टक्के पेरणी झाली आहे. मात्र, सध्या जमिनीतील ओलावा कमी झाल्याने पेरणी मंदावली आहे. गतवर्षी या काळात १३ लाख ५० हेक्टर पेरणी झाली होती, तर यावर्षी १५ लाख ११ हेक्टर पेरणी झाली आहे. रब्बी हंगामात ज्वारी हे महत्त्वाचे पीक असून त्याचे क्षेत्र १७ लाख ५३ हजार हेक्टर आहे. सध्या सरासरीच्या ४५ टक्के ज्वारीची पेरणी झालेली आहे. तर हरभऱ्याचे क्षेत्र २१.५२ लाख हेक्टर आहे. यावर्षी ५.६४ लाख हेक्टर म्हणजेच सरासरीच्या २६ टक्के पेरणी झालेली आहे.

Leave a Comment