फळपिकांसाठी विमा योजना | (FCIS) Fruit Crop Insurance Scheme

हवामानातील बदलांमुळे, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, वादळे इत्यादी हवामान धोक्यांमुळे फळपिकांचे मोठे नुकसान होते. अशा नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते आणि त्यांचे उदरनिर्वाह धोक्यात येतो. म्हणूनच, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी आणि त्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी विमा संरक्षणाची गरज आहे.

शासनाने संत्रा, मोसंबी, डाळिंब, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, स्ट्रॉबेरी आणि पपई या फळपिकांसाठी हवामान आधारित पीकविमा योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत, हवामान बदलामुळे झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळेल. सामान्यतः, ज्या महसूल मंडळात एखाद्या फळपिकाखाली २० हेक्टर किंवा त्याहून अधिक क्षेत्र आहे, अशा महसूल मंडळांना त्या फळपिकासाठी अधिसूचित करण्यात येते आणि तेथे विमा योजना राबविण्यात येते. फक्त उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षण मिळते.

2016-17 पासून 2022-23 पर्यंत, शेतकऱ्यांनी एकूण 4,459 कोटी रुपये विमा हप्ता भरला आहे. या कालावधीत, सरकारने 3,964 कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर केली आहे. विमा नुकसान भरपाईचे एकूण विमा हप्त्याशी प्रमाण 89% आहे. शेतकऱ्यांनी भरलेला विमा हप्ता 782 कोटी रुपये आहे. विमा नुकसान भरपाईचे शेतकऱ्यांनी भरलेला विमा हप्त्याशी प्रमाण 507% आहे.

Artificial Intelligence (AI): भविष्यातील तंत्रज्ञान जे तुमचे जीवन, नोकरी आणि व्यवसाय संपूर्णपणे बदलू शकते!

सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड
जमीन धारणा ७/१२, ८(अ) उतारा
पीक लागवड स्वयंघोषणा पत्र
फळबागेचा (Geo Tagging) केलेला फोटो
बँक पासबुक
नोंदणीकृत भाडेकरार

अधिक माहितीसाठी पोर्टल
www.pmfby.gov.in

वर्षभर रिचार्ज करण्याचे टेन्शन दूर; मोफत मिळेल डिस्नी प्लस, आणि हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन, जाणून घ्या एअरटेलच्या ‘या’ खास प्लॅन्सबद्दल Airtel Recharge

Leave a Comment